Thursday, March 22, 2018

गरिबी...

परिस्थिती आर्थिकदृष्ट्या वाईट असताना , पैसा जोडत - साठवत जाणे , हौसमौज न करणे , वायफळ खर्च न करणे, आहे त्यात भागवायचा प्रयत्न करणे ही म्हणजे काटकसर...
ती आयुष्यात प्रत्येकाला केव्हा ना केव्हा , कमी / जास्त प्रमाणात करावी लागते.
पण परिस्थिती चांगली झाल्यावर , आर्थिक आवक चांगली झाल्यावर आपल्या आवडीच्या गोष्टींवर , छंदावर, updated सोयीसुविधांवर पुरेसा पैसा नक्की खर्च करावा. चांगले, पौष्टिक खावे / प्यावे.
पण ह्या गोष्टी जे करू शकत नाहीत ते काटकसरीची सीमारेषा ओलांडून कंजूषपणाकडे वळलेले असतात.
      काही वेळा खूप वर्षे काटकसरीत काढलेल्याना लाखो रुपये मिळाले तरी मुळाशी कसलीतरी अनामिक भीती असते बहुतेक की 'ते दिवस परत आले तर?' किंवा
( इतक्या वर्षांच्या काटकासरीचा ) सवयीचा परिणामही असू असतो की चांगले दिवस येऊनही ते मानसिक गरिबीतच जगतात....
    ही भीती वाढत्या वयाची अपरिहार्यताही असावी कदाचित ......
मानसिक गरिबी आणि आर्थिक गरीबी यांचं एक दुष्टचक्र असतं, जोपर्यंत आपण त्यावर मात करत नाही तोपर्यंत  ते  आपली पाठ सोडत  नाही.....
मग साठवलेल्या पैशाला नको असलेल्या अनेक वाटा फुटत जातात ....

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

No comments:

Post a Comment