#_P_R_O
घरातील सगळीच माणसे मनमिळावू आहेत अशी कुटुंबे फार कमी . उरलेल्या बाकी घरातील लोकांमध्ये कोणी एक व्यक्ती PRO( public relation officer ) असते.....
नातेवाईक, शेजारी-पाजारी, त्यातुन निर्माण झालेल्या ओळखी, ह्या सगळ्या लोकांना आपल्या घराशी ही व्यक्ती जोडून ठेवतो. हा PRO चा बिनपगारी job सोपा नाही.
विरुद्ध स्वभावाच्या माणसांना हँडल करणे ,
अहंकारी लोकांची मने सांभाळणे,
एखाद्या सण समारंभात एकमेकांशी न पटणाऱ्या दोन व्यक्तींची मर्जी राखणे,
सतत कटकट करणाऱ्याला एखाद्याला समंजसपणे सामावून घेणे,
जे काही थोडेफार शहाणे , समजूतदार असतात त्यांनाही कायम गृहीत न धरता ,त्यांचे कोड पुरवणे ,
वयस्कर लोकांच्या तब्येतीची आवर्जून चौकशी करणे.....वगैरे वगैरे
अशा अनेक कसरती त्यांना दरवेळी कराव्या लागतात.
काही फेक PRO पण असतात , कोणाचं काय चाललंय हे कळावं (म्हणजे गॉसिप ला विषय मिळतो)किंवा (तो आमकां/ढमका मुळीच करत नाही पण )आम्ही सगळ्यांचे सगळे कसे करतो याचे मानसिक समाधान त्यांना मिळवायचे असते.
तारेवरची कसरत सांभाळून आपले कुटुंब इतर माणसांशी, समाजाशी जोडून ठेवणार्या ओरिजनल PRO ना
Hat's off ....👌
© वीरश्री वैद्य - करंदीकर
Friday, November 10, 2017
Monday, November 6, 2017
हनुमॅन
#_हनुमॅन
भीती वाटली किंवा कोणतीही ताकदीची सीमा म्हंटली की आठवायचा तो मारुतीराया. लहानपणीचा सगळ्यात आवडता आणि जवळचा वाटणारा देव.
आजोबांनी गोष्टी सांगताना हनुमान त्याच्या वेगवेगळ्या पैलुंसकट इतका सुंदर उभा केला होता की बाकी कुठलेही सुपरहिरो मला तितकेसे कधी आवडले नाहीत. मुळात त्यांच्यात आणि इतर सुपरहिरो मध्ये मुख्य फरक हा की, भीती वाटल्यावर किंवा संकटांच्या वेळी सुपरमॅन नाही आठवत किंवा आठवून बघितला तरी धीर नाही येत, पण कधी एकदा सुद्धा म्हणलेले मारुतीस्तोत्र किंवा त्याची एखादी गोष्ट आठवून बघा आलेल्या अडचणींचा सामना करण्याची ताकद नककी येईल.
पुढे संदीप खरे च ' सुपरमॅन' गाणं ऐकल्यावर वाटलं की हे गाणं लहान मुलांसाठी नाहीच . या गाण्यात सुपरमॅन खूप ताकदवान, सगळ्यांना मदत करतो, अडचणींना धावून जातो, सगळ्यांचा फेव्होरेट... पण आतून का कोण जाणे त्याला एकट वाटतं , उदासपणा येतो. अशा एकटेपणातच एका उंच शिखरावर गेला असता त्याला हनुमान भेटतो ....
त्याला कर्मयोग सांगतो, आत्मभान देतो.
कासव' film ची समीक्षा वाचल्यावर तर हे गाणं आणि मारुतीराया पुन्हा प्रकर्षाने आठवला.
वालीच्या सैन्याचा सेनापती 'केसरी' चा तो मुलगा , जन्मतानाच चांदीचा चमचा जणू तोंडात घेऊन आलेला....
वडिलांनी बेस सेट केलेला .... उत्तम शिक्षण देऊ केलेला , भाषा /व्याकरण यात पारंगत ..व्यायामाने , तंत्रशुद्ध बाहुबल आत्मसात केलेला .....
अगदी आताच्या पिढीसारखा, ज्यांना आधीच पायघड्या घालून ठेवल्यात (बेस सेट आहे असा)
पण....
अतुल बुद्धी आणि अचाट शक्ती आपल्या राम भक्तीने (आपण आत्मभानाने म्हणूया ) संयमित केली त्याने ....
त्यामुळे त्याला कधी frustration आलें नाही....
एकटेपणा / पोकळी असले काहीही जाणवले नाही...
आपल्या हातून योग्य कार्य राम करवून घेतो, आपण निमित्त मात्र... याच भावनेने कार्य केल्यानें संकटमोचन झाला...
मुलांना येणारे ताण,तणाव यावर उपाय लहानपणापासूनच आपल्या या देशी सुपरहिरो ची नीट ओळख करून द्यायला हवी, पालकांनीच तो आधी नीट समजून घ्यायला हवा.
मारुतीस्तोत्र, त्याचा अर्थ..याने त्यांना धीर तर मिळेलच पण आताच्या तरुण पिढीला येणारे frustration, निराश यावरही नक्कीच हा 'रामबाण' उपाय ठरेल असे मला एक पालक म्हणून वाटते .
आफळे बुवांच्या कीर्तनात त्यांनी कुठल्याही चमत्काराशिवाय , माणूस म्हणून हनुमान ( अगदी लॉजिकली ) मांडलाय. प्रत्येक पालकाने ऐकावे असे हे किर्तन, त्याची लिंक
https://youtu.be/yUJhGFb6BMQ
वीरश्री वैद्य - करंदीकर
भीती वाटली किंवा कोणतीही ताकदीची सीमा म्हंटली की आठवायचा तो मारुतीराया. लहानपणीचा सगळ्यात आवडता आणि जवळचा वाटणारा देव.
आजोबांनी गोष्टी सांगताना हनुमान त्याच्या वेगवेगळ्या पैलुंसकट इतका सुंदर उभा केला होता की बाकी कुठलेही सुपरहिरो मला तितकेसे कधी आवडले नाहीत. मुळात त्यांच्यात आणि इतर सुपरहिरो मध्ये मुख्य फरक हा की, भीती वाटल्यावर किंवा संकटांच्या वेळी सुपरमॅन नाही आठवत किंवा आठवून बघितला तरी धीर नाही येत, पण कधी एकदा सुद्धा म्हणलेले मारुतीस्तोत्र किंवा त्याची एखादी गोष्ट आठवून बघा आलेल्या अडचणींचा सामना करण्याची ताकद नककी येईल.
पुढे संदीप खरे च ' सुपरमॅन' गाणं ऐकल्यावर वाटलं की हे गाणं लहान मुलांसाठी नाहीच . या गाण्यात सुपरमॅन खूप ताकदवान, सगळ्यांना मदत करतो, अडचणींना धावून जातो, सगळ्यांचा फेव्होरेट... पण आतून का कोण जाणे त्याला एकट वाटतं , उदासपणा येतो. अशा एकटेपणातच एका उंच शिखरावर गेला असता त्याला हनुमान भेटतो ....
त्याला कर्मयोग सांगतो, आत्मभान देतो.
कासव' film ची समीक्षा वाचल्यावर तर हे गाणं आणि मारुतीराया पुन्हा प्रकर्षाने आठवला.
वालीच्या सैन्याचा सेनापती 'केसरी' चा तो मुलगा , जन्मतानाच चांदीचा चमचा जणू तोंडात घेऊन आलेला....
वडिलांनी बेस सेट केलेला .... उत्तम शिक्षण देऊ केलेला , भाषा /व्याकरण यात पारंगत ..व्यायामाने , तंत्रशुद्ध बाहुबल आत्मसात केलेला .....
अगदी आताच्या पिढीसारखा, ज्यांना आधीच पायघड्या घालून ठेवल्यात (बेस सेट आहे असा)
पण....
अतुल बुद्धी आणि अचाट शक्ती आपल्या राम भक्तीने (आपण आत्मभानाने म्हणूया ) संयमित केली त्याने ....
त्यामुळे त्याला कधी frustration आलें नाही....
एकटेपणा / पोकळी असले काहीही जाणवले नाही...
आपल्या हातून योग्य कार्य राम करवून घेतो, आपण निमित्त मात्र... याच भावनेने कार्य केल्यानें संकटमोचन झाला...
मुलांना येणारे ताण,तणाव यावर उपाय लहानपणापासूनच आपल्या या देशी सुपरहिरो ची नीट ओळख करून द्यायला हवी, पालकांनीच तो आधी नीट समजून घ्यायला हवा.
मारुतीस्तोत्र, त्याचा अर्थ..याने त्यांना धीर तर मिळेलच पण आताच्या तरुण पिढीला येणारे frustration, निराश यावरही नक्कीच हा 'रामबाण' उपाय ठरेल असे मला एक पालक म्हणून वाटते .
आफळे बुवांच्या कीर्तनात त्यांनी कुठल्याही चमत्काराशिवाय , माणूस म्हणून हनुमान ( अगदी लॉजिकली ) मांडलाय. प्रत्येक पालकाने ऐकावे असे हे किर्तन, त्याची लिंक
https://youtu.be/yUJhGFb6BMQ
वीरश्री वैद्य - करंदीकर
Thursday, October 5, 2017
...... आणि मावशी जगो...
#________आणि_मावशी_जगो
आईपेक्षा लहानपणी मुलांना मावशीनेच जास्त सांभाळलेले असते .
मावशी लहान असेल तर मग दंगा , मस्ती , खोड्या
असा डाम्रटपणा करायला त्यांना खुल्ली सूट मिळावी, म्हणून ती त्याच्यात सामील होते,
आईच्या वटारलेल्या डोळ्यांना मग कोणी भाव देत नै
( एकूण काय .... आईचे काsssही चालत नाही)
मावशी मोठी असेल तर ती लाड खूप करते, म्हणेल तो ड्रेस, म्हणेल तो पदार्थ खायला , म्हणेल तिथे फिरायला ....... कारण इथे आईवर डोळे वटारायचा अधिकार तिला असतो.
( इथेही ........आईचे काsssही चालत नाही)
कसलीही मदत न करता उगाच फुकाचे सल्ले देण्यात लोक व्यस्त असतात तेव्हा मावशी बाळाची शी धुण्यापासूनची कामे करण्यात बाळाच्या आईला मदत करत असते.
न रागावता , न ओरडता मुलांच्या कलानी घेत त्यांना समजावून देत चांगल्या सवयी लावण्यात मावशीचा हातखंडा असतो. ..... तुला सगळ्यात जास्त कोण आवडते???
असे भाचेकंपनीला बुचकळ्यात टाकणारे प्रश्न ती विचारत नाही . त्यांच्या मनातली आपली जागा ती राखून असते.
सारखे खेळणी , खाऊ , काही ना काही gift असले फसवे temptation न देता , न दाखवताही ती भाचेकंपनीची लाडकी होते.
मुलं निरागस असतात म्हणूनच कोण मायेने आपले करते ते त्यांनाही चांगले ठाऊक असते.
विंदा करंदीकर यांची एक छोटीशी पण बरीच बोलकी कविता
मावशी
सोलापूरहून
येते काकू;
माझ्यासाठीं
आणते चाकू.
कोल्हापूरहून
येते आत्ते;
माझ्यासाठी
आणते पत्ते.
राजापूरहून
मावशी येते;
माझा एक
पाप्पा घेते.
© वीरश्री वैद्य - करंदीकर
आईपेक्षा लहानपणी मुलांना मावशीनेच जास्त सांभाळलेले असते .
मावशी लहान असेल तर मग दंगा , मस्ती , खोड्या
असा डाम्रटपणा करायला त्यांना खुल्ली सूट मिळावी, म्हणून ती त्याच्यात सामील होते,
आईच्या वटारलेल्या डोळ्यांना मग कोणी भाव देत नै
( एकूण काय .... आईचे काsssही चालत नाही)
मावशी मोठी असेल तर ती लाड खूप करते, म्हणेल तो ड्रेस, म्हणेल तो पदार्थ खायला , म्हणेल तिथे फिरायला ....... कारण इथे आईवर डोळे वटारायचा अधिकार तिला असतो.
( इथेही ........आईचे काsssही चालत नाही)
कसलीही मदत न करता उगाच फुकाचे सल्ले देण्यात लोक व्यस्त असतात तेव्हा मावशी बाळाची शी धुण्यापासूनची कामे करण्यात बाळाच्या आईला मदत करत असते.
न रागावता , न ओरडता मुलांच्या कलानी घेत त्यांना समजावून देत चांगल्या सवयी लावण्यात मावशीचा हातखंडा असतो. ..... तुला सगळ्यात जास्त कोण आवडते???
असे भाचेकंपनीला बुचकळ्यात टाकणारे प्रश्न ती विचारत नाही . त्यांच्या मनातली आपली जागा ती राखून असते.
सारखे खेळणी , खाऊ , काही ना काही gift असले फसवे temptation न देता , न दाखवताही ती भाचेकंपनीची लाडकी होते.
मुलं निरागस असतात म्हणूनच कोण मायेने आपले करते ते त्यांनाही चांगले ठाऊक असते.
विंदा करंदीकर यांची एक छोटीशी पण बरीच बोलकी कविता
मावशी
सोलापूरहून
येते काकू;
माझ्यासाठीं
आणते चाकू.
कोल्हापूरहून
येते आत्ते;
माझ्यासाठी
आणते पत्ते.
राजापूरहून
मावशी येते;
माझा एक
पाप्पा घेते.
© वीरश्री वैद्य - करंदीकर
Tuesday, October 3, 2017
Sweet home
स्वतःचाच घरात बोअर झालंय किंवा कंटाळा आलाय असं कोणी म्हणालं की मला फार फार आश्चर्य वाटायचं की असं कसं होऊ शकतं ?, ज्या घरात लहानपण घालवलंय त्या घरात कंटाळा कसा येऊ शकतो ?
शिक्षणासाठी मुलं परगावी जातात..... हळूहळू त्यांचे सामान कमी कमी व्हायला लागते ..... ते गेल्यावर त्यांच्या कप्प्यावर , जागांवर अतिक्रमण व्हायला सुरुवात होते .... स्टेशनरीच्या कप्यात स्क्रू ड्राईव्हर , खिळे, इलेक्ट्रॉनिक वस्तू , चार्जर, बॅटरी इ. इ. असे काही समान जायला सुरुवात होते , कपडे कप्प्यात कोपऱ्यात सरकवले जातात , तो कप्पा extra वाले , आहेरात आलेले कपडे , शाली, टोप्या यांचाच होऊन जातो......मोठी झाली मुलं..... आता काय करायचेत स्केचपेन?, काय करणार त्या चकचकीत कागदांचे ? असे म्हणत म्हणत stationary वगैरे हळूहळू हद्दपार व्हायला सुरुवात होते .
मुलांच्या या nostalgic , विरंगुळ्याच्या जागा कमी झाल्या , किंवा त्या जागेला भागीदार आले की मग करमेनासे होत असावे बहुतेक. मुलीचे दागिने , कपडे यांना आईच्या कप्प्यात जरातरी एखादी वेगळी जागा मिळते , पण बरेचदा मुलांचे तसे होत नसेल ..... आणि एव्हाना मित्रांची लग्न पण झालेली असतात, कुणी बाहेर set झालेला असतो , तर कुणाच्या priorities बदललेल्या असतात........ज्यांच्या घरी जाता यावे असे कोणी नातेवाईक नसतात.......
शिक्षण , नोकरी निमित्त, बाहेर राहून सुदधा मला घरी नेहमीच करमायचे
कारण
ड्रॉवर मध्ये भरलेली भरपुर स्टेशनरी , क्राफ्ट चे समान , वेळोवेळी जमवलेले चमकदार कागद , थर्माकोल चे गोळे , लेस , टिकल्या , विणकामाचे समान .... वगैरे वगैरे .....
याने मन भरलं की वाचायला भरपूर पुस्तके .....
वाचायचा मूड नसेल तर बागकामाला वाव .....
हे सुद्धा नको असेल तर घरात बागडणारे , खेळणारे मांजर
मांजर बाहेर गेले असेल तर गच्चीवर ची मस्त हवा ......
मामा , मावशीकडे जाऊन गप्पाटप्पा........
संध्याकाळी चौघे एकत्र जमलो की दिवसभरात काय झालेे याची देवाण घेवाण , चिडचिड / कटकट नाही....
एखादा विनोदी सिनेमा किंवा विनोदी मलिका एकत्र बघणे ......... रोजच्या बातम्यांवर चर्चा......
वगैरे.........वगैरे........
,© वीरश्री वैद्य - करंदीकर
शिक्षणासाठी मुलं परगावी जातात..... हळूहळू त्यांचे सामान कमी कमी व्हायला लागते ..... ते गेल्यावर त्यांच्या कप्प्यावर , जागांवर अतिक्रमण व्हायला सुरुवात होते .... स्टेशनरीच्या कप्यात स्क्रू ड्राईव्हर , खिळे, इलेक्ट्रॉनिक वस्तू , चार्जर, बॅटरी इ. इ. असे काही समान जायला सुरुवात होते , कपडे कप्प्यात कोपऱ्यात सरकवले जातात , तो कप्पा extra वाले , आहेरात आलेले कपडे , शाली, टोप्या यांचाच होऊन जातो......मोठी झाली मुलं..... आता काय करायचेत स्केचपेन?, काय करणार त्या चकचकीत कागदांचे ? असे म्हणत म्हणत stationary वगैरे हळूहळू हद्दपार व्हायला सुरुवात होते .
मुलांच्या या nostalgic , विरंगुळ्याच्या जागा कमी झाल्या , किंवा त्या जागेला भागीदार आले की मग करमेनासे होत असावे बहुतेक. मुलीचे दागिने , कपडे यांना आईच्या कप्प्यात जरातरी एखादी वेगळी जागा मिळते , पण बरेचदा मुलांचे तसे होत नसेल ..... आणि एव्हाना मित्रांची लग्न पण झालेली असतात, कुणी बाहेर set झालेला असतो , तर कुणाच्या priorities बदललेल्या असतात........ज्यांच्या घरी जाता यावे असे कोणी नातेवाईक नसतात.......
शिक्षण , नोकरी निमित्त, बाहेर राहून सुदधा मला घरी नेहमीच करमायचे
कारण
ड्रॉवर मध्ये भरलेली भरपुर स्टेशनरी , क्राफ्ट चे समान , वेळोवेळी जमवलेले चमकदार कागद , थर्माकोल चे गोळे , लेस , टिकल्या , विणकामाचे समान .... वगैरे वगैरे .....
याने मन भरलं की वाचायला भरपूर पुस्तके .....
वाचायचा मूड नसेल तर बागकामाला वाव .....
हे सुद्धा नको असेल तर घरात बागडणारे , खेळणारे मांजर
मांजर बाहेर गेले असेल तर गच्चीवर ची मस्त हवा ......
मामा , मावशीकडे जाऊन गप्पाटप्पा........
संध्याकाळी चौघे एकत्र जमलो की दिवसभरात काय झालेे याची देवाण घेवाण , चिडचिड / कटकट नाही....
एखादा विनोदी सिनेमा किंवा विनोदी मलिका एकत्र बघणे ......... रोजच्या बातम्यांवर चर्चा......
वगैरे.........वगैरे........
,© वीरश्री वैद्य - करंदीकर
Wednesday, September 13, 2017
#Are_u_a_solution__Or_part_of_the_problem_?
एखादी emergency असणारी परिस्थिती म्हणजे accident , operation वगैरे........ . इथे खमक्या(कणखर) लोकांची फार फार गरज असते .
सुतकी चेहरा करून वावरणे, हातपाय गाळून बसणे, उगाच वाईट साईट विचार करणे अशाने ज्या व्यक्तीवर emergancy ओढवली आहे त्याच्या भोवतीही एक उदासवाणे , निराशाजनक वातावरण पसरते.
अशा वेळी तिथले वातावरण नीट करण्यासाठी खमक्या लोकांचा positive attitute परिणामकारक ठरतो.
खमके , कणखर म्हणजे कोरडे वा भावनाशून्य नव्हे. ( कारण असा अर्थ बरेच लोक काढतात.)
खरेतर खमकेपणा हा ज्यावर ही emergacy ओढवली असेल त्याच्या काळजीपोटीच येतो. ( rather तो यायला हवा )
त्याच्या आजूबाजूचे negative वातावरण घालवणे ,भक्कम मानसिक आधार देणे या हेतूनेच येतो. काही लोक जात्याच खमके असतात तर काहींना परिस्थिती बनवते.
ज्या घरचे लोक खमके असतात तिथे व्यक्ती आपल्यावर आलेल्या अडचणी , office चे टेन्शन, इतर ताणतणाव मोकळेपणाने मांडू शकतो. अति काळजी असणाऱ्या घरात मुले इंडिपेंडंट झाली की घरच्यांना मानसिक त्रास होऊ नये म्हणून आपले tensions साधे बोलतही नाहीत.
Generaly अति काळजी करणाऱ्या लोकांना high / low Bp वा heart problems असतात. आपल्या अडचणी सांगितल्या तर धीर मिळणे तर लांबच, यांचीच तब्येत बिघडून नवी emergancy नको, असा शहाणा विचार असतो यामागे.
'तुम्ही / तो /ती आम्हाला काssही ( अडचणी, problems) सांगत नाही' अशी तक्रार करण्याआधी आपण तेवढे सक्षम आहोत का, हा विचार नक्कीच व्हायला हवा .
एक वाक्य फार पूर्वी वाचनात आले होते , ते या situation ला चपखल बसते
#Are_u_a_solution__Or_part_of_the_problem_?
@ वीरश्री वैद्य - करंदीकर
एखादी emergency असणारी परिस्थिती म्हणजे accident , operation वगैरे........ . इथे खमक्या(कणखर) लोकांची फार फार गरज असते .
सुतकी चेहरा करून वावरणे, हातपाय गाळून बसणे, उगाच वाईट साईट विचार करणे अशाने ज्या व्यक्तीवर emergancy ओढवली आहे त्याच्या भोवतीही एक उदासवाणे , निराशाजनक वातावरण पसरते.
अशा वेळी तिथले वातावरण नीट करण्यासाठी खमक्या लोकांचा positive attitute परिणामकारक ठरतो.
खमके , कणखर म्हणजे कोरडे वा भावनाशून्य नव्हे. ( कारण असा अर्थ बरेच लोक काढतात.)
खरेतर खमकेपणा हा ज्यावर ही emergacy ओढवली असेल त्याच्या काळजीपोटीच येतो. ( rather तो यायला हवा )
त्याच्या आजूबाजूचे negative वातावरण घालवणे ,भक्कम मानसिक आधार देणे या हेतूनेच येतो. काही लोक जात्याच खमके असतात तर काहींना परिस्थिती बनवते.
ज्या घरचे लोक खमके असतात तिथे व्यक्ती आपल्यावर आलेल्या अडचणी , office चे टेन्शन, इतर ताणतणाव मोकळेपणाने मांडू शकतो. अति काळजी असणाऱ्या घरात मुले इंडिपेंडंट झाली की घरच्यांना मानसिक त्रास होऊ नये म्हणून आपले tensions साधे बोलतही नाहीत.
Generaly अति काळजी करणाऱ्या लोकांना high / low Bp वा heart problems असतात. आपल्या अडचणी सांगितल्या तर धीर मिळणे तर लांबच, यांचीच तब्येत बिघडून नवी emergancy नको, असा शहाणा विचार असतो यामागे.
'तुम्ही / तो /ती आम्हाला काssही ( अडचणी, problems) सांगत नाही' अशी तक्रार करण्याआधी आपण तेवढे सक्षम आहोत का, हा विचार नक्कीच व्हायला हवा .
एक वाक्य फार पूर्वी वाचनात आले होते , ते या situation ला चपखल बसते
#Are_u_a_solution__Or_part_of_the_problem_?
@ वीरश्री वैद्य - करंदीकर
Tuesday, August 15, 2017
नवरे येती स्वयंपाकघरा
#_नवरे_येती_स्वयंपाकघरा
काही नमुने :-
नवरा -भांडं कुठं आहे ?
बायको- खालच्या कप्प्यात.
नवरा - डाळीचे पीठ?
बायको - वरच्या कप्यात उजव्या बाजूला.
नवरा - चिरलेली भाजी?
बायको - फ्रीज मध्ये.
नवरा - मोठा डाव कुठे ठेवलास ?
बायको - ड्रॉवर मध्ये.
नवरा - मसाल्याचा डबा ?
बायको - ?????? 😠😠😠
राहू दे मीच करते ......
******************************************
नवरा खिचडी करणार असतो.
कट्ट्यावरचे त्याने मांडलेले सामान
तांदूळ , मुगाची डाळ, मिसळणाचा डबा , गुळाचा डबा पाण्याचा ग्लास, मीठ , कोथींबीर, सूरी , डाव वगैरे
बायको - ( हे सगळं बघून ) काय कुकरी शो वाले येणारेत
का ? खिचडीचं coverage घ्यायला ?
*******************************************
नवऱ्याने पदार्थ करून झालेला , कट्टा (चक्क) स्वच्छ ,
पण......
सिंक मध्ये भांड्यांचा डोंगर...chopping board , किसणी सुरी सकट....
*******************************************
बायको - जरा भाजी टाकता का?
नवरा - बरं , पण मी माझ्या आवडत्या भांड्यात करणार.
भाजी झाली
10 जणांची भाजी होईल एवढं मोठ्ठ भांडं (आवडतं☺)
त्यावर काचेचं जड झाकण
भाजी .... भांड्यांच्या तळाशी
********************************************
नवरा - आज मी करतो (बनवतो )नाष्टा
बायको - बरं , करून झाला की मला स्वयंपाकघर
परत पूर्वीसारखं करून द्या .
*********************************************
दुर्मिळ किंवा काहींच्या स्वप्नातील नवरा
स्वयंपाक तयार ....
भांडी घासलेली......
गॅस , कट्टा साफ .....
**********************************************
© वीरश्री वैद्य - करंदीकर
काही नमुने :-
नवरा -भांडं कुठं आहे ?
बायको- खालच्या कप्प्यात.
नवरा - डाळीचे पीठ?
बायको - वरच्या कप्यात उजव्या बाजूला.
नवरा - चिरलेली भाजी?
बायको - फ्रीज मध्ये.
नवरा - मोठा डाव कुठे ठेवलास ?
बायको - ड्रॉवर मध्ये.
नवरा - मसाल्याचा डबा ?
बायको - ?????? 😠😠😠
राहू दे मीच करते ......
******************************************
नवरा खिचडी करणार असतो.
कट्ट्यावरचे त्याने मांडलेले सामान
तांदूळ , मुगाची डाळ, मिसळणाचा डबा , गुळाचा डबा पाण्याचा ग्लास, मीठ , कोथींबीर, सूरी , डाव वगैरे
बायको - ( हे सगळं बघून ) काय कुकरी शो वाले येणारेत
का ? खिचडीचं coverage घ्यायला ?
*******************************************
नवऱ्याने पदार्थ करून झालेला , कट्टा (चक्क) स्वच्छ ,
पण......
सिंक मध्ये भांड्यांचा डोंगर...chopping board , किसणी सुरी सकट....
*******************************************
बायको - जरा भाजी टाकता का?
नवरा - बरं , पण मी माझ्या आवडत्या भांड्यात करणार.
भाजी झाली
10 जणांची भाजी होईल एवढं मोठ्ठ भांडं (आवडतं☺)
त्यावर काचेचं जड झाकण
भाजी .... भांड्यांच्या तळाशी
********************************************
नवरा - आज मी करतो (बनवतो )नाष्टा
बायको - बरं , करून झाला की मला स्वयंपाकघर
परत पूर्वीसारखं करून द्या .
*********************************************
दुर्मिळ किंवा काहींच्या स्वप्नातील नवरा
स्वयंपाक तयार ....
भांडी घासलेली......
गॅस , कट्टा साफ .....
**********************************************
© वीरश्री वैद्य - करंदीकर
Friday, August 4, 2017
Friendless
#_friendless
मैत्री दिनानिमित्त थोडेसे
माझ्या परिचितांपैकी एकाच्या मुलीनी , मुलाला कोणी मित्र नाहीत म्हणून लग्नाला नकार दिला. हल्ली मुलींच्या अटी फारच असतात , फारच igo असतो हा माझा मुद्दा नाहीये.
मुलीचे म्हणणे पडले त्याला कोणीही मित्र नाहीत , म्हणजे रोज उठून सगळ्या गोष्टींबद्दल तो माझ्याच डोक्याशी कटकट करणार.
हे ऐकून मलाही वाटले होते की हे काय नकाराचे कारण असावे का? मुळात मित्र-मैत्रिणी (best friends) नसू शकतात हे काही पटेना , पण नंतर असे दोन नमुने समोर आले आणि पटले की अशीही माणसे असतात, याने एक पालक म्हणून मला विचारात पाडले.
प्रगल्भता यायला , भावनांचा योग्य निचरा व्हायला , योग्य वयात समवयीन, समविचारी मित्र-मैत्रिणी अत्यंत आवश्यक असतात.
या friendless नमुन्यांबद्दल थोडे निरीक्षण मांडते......
शाळेत ,कॉलेजमध्ये होते मित्र पण कुणी आता contact मध्ये नाही, अशी अवस्था असते. best friend वगैरे नसतात.
मग आई , वडील किंवा भावंडे यापैकीच कोणीतरी असे असते की ज्यांच्याशी ते मोकळेपणाने बोलतात. बरेचदा आईच असते.
आईच्याच डोक्याशी सगळे काही...
मुलांच्या बदलत्या वयानुसार त्यांचे मित्र होऊन समजून घेण्याची मानसिकता प्रत्येक आईची असतेच असे नाही.
( मुल कसेही असले तरी आई ला प्रिय त्यामुळे नीट मार्गदर्शन ,प्रसंगी कानउघडणी होतेच असे नाही)
त्यातून यांच्यात अनेक न्यूनगंड निर्माण झालेले असतात.
हे बरेचदा attention सिकर असतात. भावंड असेल तर ते खूप लाडके आहे , असा समज असतो. हा समज दूर करण्यासाठी आईकडून अनेकदा फाजील लाड केले जातात.
माझ्यावर कसा अन्याय झालाय , असे सारखे सारखे उल्लेखात आणून ही मुले जन्मभर त्याचा फायदा घेत आईकडून आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेतात .
त्यांचा स्वभावही चिडचिडा आणि कटकटी करणारा होऊन जातो , जरा काही मनाविरुद्ध झाले की सगळ्या घरभर कटकट करत फिरणे, आपल्याला सोडून बाकीचे सगळे मजा करतात, आपली कुणाला काही पडलेली नाही असे ग्रह करून घेणे , दुसऱ्याला त्रास होईल असे मुद्दाम वागण्याचा नतद्रष्टपणा करणे असे उद्योग सुरु होतात , आणि मग तो स्वभावच बनून जातो . मग अशा माणसांशी बोलायला तरी आवडेल का कुणाला ?
यावरचढ आईची पाठराखण , लहानपणी समवयीन मुले मुली खेळायला नव्हती ( मग शाळा ,कॉलेज मध्ये काय होते?),
काही आयाना हा अभिमान असतो आपल्या मुलांच्या आयुष्यात फक्त आपणच खूप महत्वाचे माणूस आहोत.
खरे तर ही अभिमानाची नाही , विचार करण्याची गोष्ट आहे.
मित्र - मैत्रीण नसणे ही गोष्ट व्यक्तिमत्वात अनेक negetive बदल लहानपणापासूनच आणते. (Iike slow poisoning)
असे लोक पाहिल्यावर वाटते त्या मुलीने योग्य निर्णय घेतला.
सध्या इथे फार मित्र-मैत्रीण नसणारी , आत्मकेंद्रित मुले मी पाहत आहे , किमान 5 वर्षाची झाल्यावर तरी खाऊ वाटून खाणे , खेळणी share करणे हे सुद्धा ती मुळीच करत नाहीत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर पालक म्हणून मला पडलेले काही प्रश्न
* हे असे नेमके friendless कसे काय होतात?
* इतके की वयाची चाळीशी आली तरी याना मित्र का असू नयेत ???
* आपली मुले अशी होऊ नयेत यासाठी पालक म्हणून काय करता येईल ?
* माझ्या मुलांना योग्य मित्र शोधायला / निवडायला मदत कशी करता येईल?
@ वीरश्री वैद्य - करंदीकर
मैत्री दिनानिमित्त थोडेसे
माझ्या परिचितांपैकी एकाच्या मुलीनी , मुलाला कोणी मित्र नाहीत म्हणून लग्नाला नकार दिला. हल्ली मुलींच्या अटी फारच असतात , फारच igo असतो हा माझा मुद्दा नाहीये.
मुलीचे म्हणणे पडले त्याला कोणीही मित्र नाहीत , म्हणजे रोज उठून सगळ्या गोष्टींबद्दल तो माझ्याच डोक्याशी कटकट करणार.
हे ऐकून मलाही वाटले होते की हे काय नकाराचे कारण असावे का? मुळात मित्र-मैत्रिणी (best friends) नसू शकतात हे काही पटेना , पण नंतर असे दोन नमुने समोर आले आणि पटले की अशीही माणसे असतात, याने एक पालक म्हणून मला विचारात पाडले.
प्रगल्भता यायला , भावनांचा योग्य निचरा व्हायला , योग्य वयात समवयीन, समविचारी मित्र-मैत्रिणी अत्यंत आवश्यक असतात.
या friendless नमुन्यांबद्दल थोडे निरीक्षण मांडते......
शाळेत ,कॉलेजमध्ये होते मित्र पण कुणी आता contact मध्ये नाही, अशी अवस्था असते. best friend वगैरे नसतात.
मग आई , वडील किंवा भावंडे यापैकीच कोणीतरी असे असते की ज्यांच्याशी ते मोकळेपणाने बोलतात. बरेचदा आईच असते.
आईच्याच डोक्याशी सगळे काही...
मुलांच्या बदलत्या वयानुसार त्यांचे मित्र होऊन समजून घेण्याची मानसिकता प्रत्येक आईची असतेच असे नाही.
( मुल कसेही असले तरी आई ला प्रिय त्यामुळे नीट मार्गदर्शन ,प्रसंगी कानउघडणी होतेच असे नाही)
त्यातून यांच्यात अनेक न्यूनगंड निर्माण झालेले असतात.
हे बरेचदा attention सिकर असतात. भावंड असेल तर ते खूप लाडके आहे , असा समज असतो. हा समज दूर करण्यासाठी आईकडून अनेकदा फाजील लाड केले जातात.
माझ्यावर कसा अन्याय झालाय , असे सारखे सारखे उल्लेखात आणून ही मुले जन्मभर त्याचा फायदा घेत आईकडून आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेतात .
त्यांचा स्वभावही चिडचिडा आणि कटकटी करणारा होऊन जातो , जरा काही मनाविरुद्ध झाले की सगळ्या घरभर कटकट करत फिरणे, आपल्याला सोडून बाकीचे सगळे मजा करतात, आपली कुणाला काही पडलेली नाही असे ग्रह करून घेणे , दुसऱ्याला त्रास होईल असे मुद्दाम वागण्याचा नतद्रष्टपणा करणे असे उद्योग सुरु होतात , आणि मग तो स्वभावच बनून जातो . मग अशा माणसांशी बोलायला तरी आवडेल का कुणाला ?
यावरचढ आईची पाठराखण , लहानपणी समवयीन मुले मुली खेळायला नव्हती ( मग शाळा ,कॉलेज मध्ये काय होते?),
काही आयाना हा अभिमान असतो आपल्या मुलांच्या आयुष्यात फक्त आपणच खूप महत्वाचे माणूस आहोत.
खरे तर ही अभिमानाची नाही , विचार करण्याची गोष्ट आहे.
मित्र - मैत्रीण नसणे ही गोष्ट व्यक्तिमत्वात अनेक negetive बदल लहानपणापासूनच आणते. (Iike slow poisoning)
असे लोक पाहिल्यावर वाटते त्या मुलीने योग्य निर्णय घेतला.
सध्या इथे फार मित्र-मैत्रीण नसणारी , आत्मकेंद्रित मुले मी पाहत आहे , किमान 5 वर्षाची झाल्यावर तरी खाऊ वाटून खाणे , खेळणी share करणे हे सुद्धा ती मुळीच करत नाहीत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर पालक म्हणून मला पडलेले काही प्रश्न
* हे असे नेमके friendless कसे काय होतात?
* इतके की वयाची चाळीशी आली तरी याना मित्र का असू नयेत ???
* आपली मुले अशी होऊ नयेत यासाठी पालक म्हणून काय करता येईल ?
* माझ्या मुलांना योग्य मित्र शोधायला / निवडायला मदत कशी करता येईल?
@ वीरश्री वैद्य - करंदीकर
Subscribe to:
Posts (Atom)


