Sunday, May 7, 2017

आहारबोली

माणसाच्या स्वभावाचा ढोबळ मानाने अंदाज घेण्याचे अनेक मार्ग आहेत .  हस्ताक्षर, सही, दिसणे , काही लकबी, वगैरे पण कधीकधी असे वाटते की पंगतीत वाढलेले ताट जेवताना, जेवण्याच्या आधी / नंतर त्याची जी प्रतिक्रिया असते त्यावरूनहि त्यावरूनही त्याच्या स्वभावाचा थोडा अंदाज येऊ शकतो.  म्हणजे बघा ..... समोर जेवणाचे ताट वाढून झाले आहे आणि आता खायला सुरुवात करायची आहे तेव्हा तो पहिला पदार्थही त्याच्या स्वभावाला अनुसरून उचलतो. जसे की पुरण किंवा त्याबरोबरचे गोड पदार्थ पहिल्यांदा उचलणारी माणसे स्वभावाने पण गोड असतात , ......... तळण,पापड उचलणाऱ्या माणसांचा पापड लवकर मोडतो, त्यांच्यात patience कमी असतो,.........वरणभात पहिल्यांदा खाणारी माणसे त्याप्रमाणेच साधी सरळ , atjustable असतात , ती कुठेही, कोणत्याही परिस्थितीत राहू शकतात. .........भजी उचलणारी माणसे भज्या सारखीच कुरकुरीत, नर्मविनोदी, आणि गप्पात प्रसन्नता आणणारी असतात , यांच्या सोबत असताना कधी कंटाळा येत नाही. .........जेवणाची सुरुवात खिरीपासून आणि शेवट दहिभाताने करणारी नियम पाळणारी, आणि बऱ्यापैकी निरोगी असतात .........लोणचे कुठले आहे ? आंब्याचे , लिंबाचे का मिक्स हे पाहणारे आंबटशौकीन😉 (असे माझ्या नवऱ्याचे मत आहे) असतात........ काही असेही असतात की सगळ्या पदार्थाची थोडी थोडी चव घेऊन बघतात ते लोक अतिचिकित्सक असतात.
                हि वरची माणसे मुख्यप्रवाहाची यात आणखी दोन उपप्रवाह आहेत . पहिला जेवणाच्या आधी काही reactions असणारे आणि दुसरा जेवणा नंतरची reaction असणारे.
              जेवणाच्या आधी ताटे , भांडी घ्यायला सुरुवात झाली  की भांडे स्वच्छ आहे का नाही हे बघणार आणि ताट वाढून झाल्यावर किंवा आधी पाणी चांगले आहे का नाही हे बघून त्याची चर्चा करणार . खरे बघितले तर पाणी हा optional भाग ही असू शकतो. तुम्ही जेवल्यानंतर अगदी बिसलेरी आणून पण पिऊ शकता. किंवा एखादे दिवस atjust केले तरी काही बिघडत नाही , प्रत्येकाचेच काही पथ्य नसते पण हे लोक जेवणाचा आनंद घ्यायचा सोडून यावरून मूड बिघडवून घेतात . अशी माणसे कटकट्या स्वभावाची, आणि जुळवून घेणारी नसतात , अशांना मित्रमंडळी कमी असते किंवा नसते असतीलच तर ते हि याच catagory तील असतात.
                 समोरासमोरच्या पंगतीत ताटे वाढणे सुरु आहे , अशा वेळेला समोरच्याच्या पानात अमुक आहे... माझ्या पानात नाही... ते माझ्याही पानात हवे... आत्ताच हवे म्हणून लोक वाढपी ला (चार चार वेळेला) बोलावून वाढून घेतात ,भले त्यांना तो पदार्थ जाणार असो वा नसो. हे लोक jelous असतात . सतत त्यांना स्वतःची तुलना इतरांशी करायची सवय असते .
                  गोड पदार्थ वाढणारा मुख्य स्वयंपाकी ते वाढत असतानाच " हम्म मी काय म्हणालोे अहो बासुंदीच आहे ,  म्हणजे 160 रुपये ताट, स्वस्त पडले " असा डायलॉग मारणारे एकतर लग्नात मुलाकडचे असतात किंवा अत्यंत व्यवहारी , कंजूष मनोवृत्तीचे असतात ( हेच लोक कपडे खरेदीला ऐपत असतानाही कपड्या आधी price tag बघतात)
                 जेवणाच्या आधी आणि जेवण जेवताना सुद्धा जे लोक ," बाकी सगळे ठीक होते , पण टॉयलेट काही नीट स्वच्छ नव्हते" असे म्हणून त्यांना अंघोळीला आणि बाकीच्या विधींना काय आणि कसे करावे लागले हा विषय काढतात ती अत्यंत निगेटिव्ह मनोवृत्तीची असतात .समोर चांगले ताट वाढले आहे त्याचा आस्वाद घ्यायचा सोडून असले काहीतरी फालतू विषय काढून ते स्वतःची जागा दाखवून देतात.
                   ताट वाढल्यावर त्यावर यथेच्छ ताव मारून मस्त ढेकर देणारे एकतर खवय्ये असतात किंवा स्वभावतः च आनंदी .
                  या सर्वांपालिकडे एक विशेष catagory आहे .सगळे जेवण झाल्यावर "ताक आहे का ?" म्हणून विचारणार आणि नाही  म्हणल्यावर " अरेरे ताक असते ना तर मजा अली असती " असा शेरा मारणारे .....तेच ते ....
बरोबर ओळखलंत ......एकमेवाद्वितीय.... पुणेकर ...🤗
               
ता. क. या लेखाच्या कल्पनेचे श्रेय माझ्या (वाढलेल्या ताटातील भजी पहिल्यांदा उचलणाऱ्या) नवऱ्याला जाते.☺

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

No comments:

Post a Comment