Monday, June 26, 2017

'ME' time

               प्रत्येकीने स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे , विशेषतः लग्नानंतर...........आधी नवा संसार आणि नंतर मुलं त्यामुळे वेळच मिळत नाही....हे पालुपद 90% बायका हमखास वापरतात........सकाळ पासून संध्याकाळ पर्यँत घरची कामे , पोरांचे खाणे - पिणे, यातच कसा वेळ जातो याचीच चर्चा करतात.....भेटल्यावरही. (जणू काही जगातले सगळे दुसरे विषय बॅन आहेत )
        जोपर्यत मुले लहान असतात, आपल्यावर अवलंबून असतात तोपर्यंत काही वाटत नाही.
पण ती जेव्हा independent होतात ........त्यांचे जग विस्तारत जाते .........त्यावेळी आई जवळ भरपूर रिकामा वेळ राहतो आणि तो खायला उठतो.
                मग आधी खूप वर्ष बऱ्याच गोष्टी मागे पडलेल्या असतात छंद, आवडीनिवडी इ. इ.
काहीतरी घटना , निमित्ताने त्या आठवतात नाहीतर एव्हाना त्याचा पूर्ण विसर पडलेला असतो ......... त्याकडे परत जावं तर ते out of syllabus वाटते नाहीतर आपण तरी त्या गोष्टीच्या out of syllabus वाटायला लागतो.
कारण छंद, आवडीनिवडी यांना सुद्धा upadation असतात , ती करावी लागतात.
हा परत जायचा मार्ग अनेकजणीना मिळत नाही.....
नक्की आपल्याला काय हवंय कळत नाही ........
सगळंच बिनसतं मनात......
          एव्हाना एक चाकोरीबद्ध आयुष्य आणि रुटीन नकळत तयार झालेले असते...... मग बाकीचे लोक पण तुम्हाला त्याच पद्धतीने गृहीत धरायला लागतात.(याला कारण तुम्हीच असता)
          एखाद्या कोणाला आपल्यासारखीच आवड , किंवा छंद असल्यास "मी पण आधी करायचे " हे वाक्य तुम्हाला कितीही nostaligic वाटलं तरी समोरच्याला ते एकतर बोअर वाटतं किंवा खोटं.
ज्यांना सारखं सारखं घर आवरणे आणि सारखं सारखं नवीन काहीतरी स्वयंपाकात करणे हे दोनच छंद असतील , त्यांच्यासाठी ही पोस्ट नाहीच , कारण त्यांना हे रिकामेपण येणार नाही कदाचित.

मग आल्यागेल्याचे करा ,त्यांना खाऊ बांधून द्या, डबे भरून द्या,  पुन्हा पुढच्या येणाऱ्यांची तयारी करा, असे सगळे करता करता आपला जन्मच पुड्या बांधण्यासाठी असे स्वतः लाच पटवून द्यायची वेळ येते .
         बोलताना कायम आपल्या घरच्यांचे आणि मुलांचे सांगत बसणं........सकाळी ही भाजी न संध्याकाळी ती.........   एखादे दुःख घेऊन कुरवाळत बसणं ....त्यावर sympathy मिळवण ..... काही नाही तर रटाळ सीरिअल वर चर्चा..... असले विषय तुम्हाला त्याच मनस्थितीत अडकवून ठेवतात.
        आपला आनंद आणि inner piece टिकवून ठेवायचा असेल तर आपले छंद , आवडीनिवडी यांना वेळ द्या. ज्यांची मुले लहान आहेत त्यांना रोज देणे शक्य नसेल , मग आठवड्यातून दोनदा ,तीनदा एखादा तास तरी स्वतः साठी नक्की काढाच. वेळ न मिळण्याचे अनेक बहाणे असतात, कारण तो मिळत नाही ..... काढावा लागतो....
वेगळा वेळ काढायचा तर ठरवलेली कामं राहणार हे तर आलेच.....मग त्या praorities ठरवा पण स्वतः साठी वेळ काढाच......
@वीरश्री वैद्य - करंदीकर


No comments:

Post a Comment