इथे सध्या summer चालू आहे . घरातूनच समोरचा पार्क दिसतो. बऱ्याच भारतीय लोकांचे ज्येष्ठ आई - वडील आलेले दिसतात . बघून खूप बरे वाटते.
या इथे येणाऱ्या आई वडिलांचे मला कौतुक आहे ते याचसाठी की
' , आम्ही काही येणार नाही ....... तुम्हीच या ......
आम्हाला भीती वाटते.............आम्हाला नाही करमणार..... किंवा आम्हाला आमचे घर सोडून दुसरीकडे कुठे कुठे करमत नाही. ............असली कारणे ना देता ,
जशी मुले सुट्टी-सणावाराला ( वरची कुठलीही कारणे न देता ) घरी येतात तसेच इथे आले आहेत म्हणून.
इथे येणाऱ्या आई-वडीलांपैकीपैकी बरेचजण तर कदाचित भारतात राज्याबाहेरही गेले नसतील .......
बरेच जणांना english येत नसेल...........
बाहेर वागण्याबोलण्याचा confidence ही नसेल कदाचित , पण तरीही लाडक्या मुलांसाठी ( यात मुलगा-मुलगी दोन्हीही आले) ते या सगळ्या न्यूनगंडावर मात करून 25 ते 30 तासाचा विमानप्रवास करून आले त्याच खरंच कौतुक...!
जसे आई - वडिलांना मुलांची आठवण येते ,ती जवळ असावे असे वाटते , त्याप्रमाणे मुलांनाही येतेच की , म्हणून तर ती सणावारी सुट्टी मिळाली की गावातल्या
आई-बाबांकडे धावत येतात. अगदी पुण्या-मुबई मध्ये शहरापासून लांब उपनगरात राहणारे सुद्धा सुट्टी मिळाली की मुख्य गावभागात राहणाऱ्या आपल्या आई-बाबांकडे येतात.
अगदी तसेच....... इथे येणारे आई - बाबा करतात.😊
@ वीरश्री वैद्य - करंदीकर
No comments:
Post a Comment