Wednesday, July 19, 2017

मूल झाल्यापासून ते किमान 4-5 वर्षाचे होईपर्यंत त्या आईला असंख्य माणसे असंख्य सल्ले देत असतात .
त्यापैकी काहीच माणसांचे सल्ले हे अचूक असतात .
( ४० - ५० सल्ले देणे , मग त्यातला एक बरोबर आल्यावर , "बघ तरी मी म्हणत होते/होतो", ही असली माणसे या अचूक सल्ले या विभागामध्ये मोडत नाहीत).
        यांचा मुख्य सल्ला criteria म्हणजे बाळाचा आकार , बाळ healthy हवे याचा अर्थ निरोगी असा न घेता, गुबगुबीत घेतला जातो.
 मग बाळ अंगाने बारीक असेल ( भले त्याचे वजन प्रमाणात का असेना)  त्याला गुबगुबीत करण्याचे असंख्य सल्ले चकटफु मिळतात.
त्याला कसं खाऊ घालायचं , लंगोट घाल , diaper नको ( किंवा vice versa), शी होत नाही का? , अमक देत जा , पातळ झाली की लगेच तमकं देत जा, सर्दी कशी झाली ?
बांधलं नव्हतं का डोक्याला?  , sweater घाल लगेच ,
 ड्रायफ्रूट दे , खजुर देच, अंड नाहीं खात, मग पनीर देच.
खात नाही , उलटी काढतो ?असं कसं काढतो ?
,घालायचं दामटून, थांब मी दाखवते / दाखवतो.

       या सगळ्या सल्ल्यांमध्ये आईला जराही उसंत मिळूच नये असं टाईट शेड्युलच सांगत असतात काहींजण....
या सल्ल्यांच्या गर्दीने आई म्हणून तिला निसर्गतः मिळालेले बेसिक instict कामच करत नाहीत.
           दुसऱ्या बाजूला आईची कामं ही आईलाच करावी लागतात , दमटून खायला घालणे या प्रकरणात उलटी , शी यांनी खराब झालेले सगळे काही आईलाच साफ करावे लागते , ते ही लगेच .......ते करायला ना सल्ले देणारे येतात,............ ना खायला घालून दाखवणारे

   कहर तर तेव्हा होतो जेव्हा मूल सांभाळण्याचा काहीही अनुभव नसणाऱ्या ( नवीन लग्न झालेल्या अर्ध्या हळकुंडाच्या...... ') 'डायपर काढून त्याला मोकळे ठेव' , मी घातली आहे ना तशी मऊ ओढणी पांघरत जा 'असले काही म्हणतात ( तेव्हा मनात ' शु - शी तू काढणार आहेस का ?' असे येतेच)........

      आता काही पूर्वीसारखी 9 - 12 व्या वर्षी लग्न होत नाहीत . आई होण्याचा विचार चालू असताना , पूर्ण medical check up करणे, निरोगी मातृत्व, गर्भसंस्कार या सगळ्याची माहिती मुली बऱ्यापैकी घेतात . बाळ आई वर अवलंबून असेपर्यंत काय काय करायचे याची मानसिक तयारी ते पोटातील बाळ , ते नऊ महिने , त्याच्या कळा या काळात होते .
( काही अपवाद असू शकतील पण निसर्गतः मादीमध्ये हे आईपण उपजतच असते).
याही पलीकडे अनुभवी माणसे महत्वाची आहेतच, अगदी कळेनासे झाले , काही भीती वाटली की नवीन आया विचारतातच , तेव्हा द्या सल्ला किंवा सांगा उपाय .
        पण या सल्ले देणाऱ्यांपैकी ( यात अनुभवी पण आली)  2 ते 3 % माणसेच अचूक सल्ला देतात. या माणसांबाबत माझे एक निरीक्षण सांगते . हे आल्या आल्या सल्ल्यांचा भडिमार करत नाहीत.
 "बाळ रडतय? मग वुडवर्ड्स ग्राईप वॉटर दे त्याला मी त्याच्या बाबाना आणि त्यांची आई तुझ्या बाबाना हेच देत होती",
( जसा काही खानदानी रिवाज असावा) असलं काही म्हणत नाहीत .
आई-बाळाचे रुटीन , त्याची अंगकाठी, झोप, भूक, आलेली अनुवंशिकता याचे एक-दोन दिवस अगदी बारीक observation करतात . आई कुठे अडतेय, तिला नेमकी कशात मदत वा अनुभवी सल्ला हवाय हे ओळखतात.
मग अशावेळेला मिळालेला सल्ला साहजिकच अचूक आणि रामबाण असतो.
माझ्या माहितीतल्या अशा बायकांनी त्यांची स्वतःची डिलिव्हरीच्या वेळेचा अंदाजही आला होता , त्या वेळी त्या स्वतःच जाऊन ऍडमिट होऊन , थोड्या वेळातच बाळाला जन्म दिलेल्या आहेत........

@वीरश्री वैद्य - करंदीकर

No comments:

Post a Comment