पुरुषाचा जन्म
परवा एक सिनेमा बघताना एक संवाद होता त्यात बहीण भावाला म्हणते "तू बदललास"(आशय : बायकोमुळे). ज्यांच्या लग्नाला चार ते सहा महिने झालेत अशा बऱ्याच मुलांना असे त्यांच्या घरच्यांकडून कधीतरी ऐकायला मिळाले असेल.
'काल काल पर्यंत कुठला शर्ट घालू?'......... ते ....'अमुक अमुक खायला कर'....... असे सांगणारा मुलगा किंवा भाऊ तेच त्याच्या बायकोला सांगू लागतो .........त्यामागे त्याचा उद्देश तिला जास्त महत्व देण्याचा नसून तिला घरात कंफर्टेबल करण्याचा असतो ,
पण त्याच्या जवळची माणसेच हे समजून न घेता त्याच्यावर सरळ आरोप करतात.
त्याच्याशी लग्न करून येणारी मुलगी हि त्याच्याच भरवशावर येत असते , आणि जन्मभर त्याच्या बरोबरची सहचारिणी म्हणून राहणार असते ........ सासरी फक्त नवराच तिचा हक्काचा माणूस असतो आणि हे त्या मुलालाही चांगले माहित असते म्हणूनच त्याची प्रायोरिटी बायको होते. ......पण याचा अर्थ असा मुळीच नसतो कि तो बाकीच्यांना विसरून गेला.
वास्तविक पाहता लग्न झाल्यानंतर मुलाच्या प्रायोरिटीज बदलणार किंवा विभागल्या जाणार यासाठी त्यांच्या घरच्यानी तयार असायला हवे........विशेषतः लहान भाऊ, बहीण यांनी तयार असायला हवे कारण आत्तापर्यंत त्यांच्यावर असलेला दादा चा फोकस आता विभागाला जाणार असतो . कधी ना कधी या लहानांचे सुद्धा लग्न होणार असते त्यांना याच प्रकारात atjust करावे लागणार असते , पण असे होताना फार कमी दिसते ......अशा वेळेला आई - वडिलानी त्यांना समजवायला हवे......त्यांना नवीन माणूस घरात येणार आहे यासाठी मानसिक दृष्टीने तयार करायला हवे.......
पण असेही फारच कमी होते.....त्यांना समजावणे दूरच
कित्येकदा त्यांच्या जोडीने
( मुलांमध्ये भेदभाव न करणारी) आईसुद्धा ज्यावेळी तू बदललास असे मुलाला म्हणत असेल त्यावेळी त्याच्या मनाची अवस्था काय असेल त्यालाच ठाऊक.
@ वीरश्री वैद्य - करंदीकर
No comments:
Post a Comment