आज खूप वर्षांनी काजवे पाहिले ( चमकले नाही पाहिले)आणि मनाला आलेली मरगळ दूर झाली.
सकाळी इथे पाऊस पडून गेला ,जमीन भुसभुशीत झाली ,मातीत गारवा आला. खूप दिवसांनी कामे लवकर आटोपली आणि बाल्कनी मध्ये बसायला मिळाले ......
आणि लक्षात आले की समोर पार्क मध्ये काजवे दिसत आहेत. खात्री झाली तेव्हा जुने काहीतरी गवसल्याचा आनंद झाला.
वेन्नानागर ला राहायचो तेव्हा खूपदा पाहिलेले, तिथे काजवे दिसणं ही खूपच comman गोष्ट होती.
मग ते बाटलीत पकडणे....तोंडात धरून चेहऱ्याचे भूत करणे हे खेळ त्याबरोबरच आले....
आजी सांगायची तिचे आजोबा धोतराच्या सोग्यात काजवे अलगद पकडून त्याचा बॅटरी सारखा उपयोग करायचे ..... मजा वाटायची तेव्हा .........
१०-१५ वर्षांनी ते पुन्हा दिसले आज ......
' कट्यार काळजात घुसली' सिनेमातील ' मनमंदिरा...' गाण्याने आठवण करून दिली होती काजव्यांची...
तो सिनेमा गाजला त्या दरम्यान ' असे कीटक खरच असतात का ?' असा प्रश्न विचारलेला कानावर आला,
तेव्हा ' म्हणजे तुम्हाला माहीत नाही?' च्या आश्चर्याबरोबर वाईट ही वाटले .
निसर्गाची ही किमया प्रदूषणाने इतकी दुर्मिळ व्हावी की काजव्यांना बघणे सोडा पण यांच्याबद्दल ऐकलेले पण नसावे?
लगेच पुढचा विचार आला ......
' म्हणजे उद्या माझ्या मुलालाही ( 'सव्य' ला )हे बघायला नाहीच मिळणार का कधी ?'
" आमच्या लहानपणी मागे light असणारे किडे होते ," अशी नुसतेच fantacy वाटणारे सांगावे लागणार असे वाटत होते .
मी माझ्या शालेय वयात गो. नि. दांडेकरांच्या भ्रमंती वर लिहिलेल्या पुस्तकांमध्ये ' भिजल्यावर चमकणारे लाकूड....
भुंग्यानी पोखरलेले बांबू बनात वारे शिरल्यावर बासरीचा आवाज काढत होते .......
असे काहीबाही निसर्गाची किमया वाटणारे अनुभव वाचले होते.
मी काजव्यांबद्दल सांगेन तेव्हा माझ्या मुलाला पण असेच वाटेल कदाचित .... असंच वाटलं होतं.
आशेचा किरण चमकणे हा वाक्प्रचार काजव्यांवरूनच घेतला असावा बहुतेक .....…...मला इतक्या वर्षांनी दिसले
म्हणजे माझ्या मुलालाही कधी ना कधी दिसतील हे जाणवलं ....
@ वीरश्री वैद्य - करंदीकर
Monday, July 10, 2017
Thursday, July 6, 2017
इथे सध्या summer चालू आहे . घरातूनच समोरचा पार्क दिसतो. बऱ्याच भारतीय लोकांचे ज्येष्ठ आई - वडील आलेले दिसतात . बघून खूप बरे वाटते.
या इथे येणाऱ्या आई वडिलांचे मला कौतुक आहे ते याचसाठी की
' , आम्ही काही येणार नाही ....... तुम्हीच या ......
आम्हाला भीती वाटते.............आम्हाला नाही करमणार..... किंवा आम्हाला आमचे घर सोडून दुसरीकडे कुठे कुठे करमत नाही. ............असली कारणे ना देता ,
जशी मुले सुट्टी-सणावाराला ( वरची कुठलीही कारणे न देता ) घरी येतात तसेच इथे आले आहेत म्हणून.
इथे येणाऱ्या आई-वडीलांपैकीपैकी बरेचजण तर कदाचित भारतात राज्याबाहेरही गेले नसतील .......
बरेच जणांना english येत नसेल...........
बाहेर वागण्याबोलण्याचा confidence ही नसेल कदाचित , पण तरीही लाडक्या मुलांसाठी ( यात मुलगा-मुलगी दोन्हीही आले) ते या सगळ्या न्यूनगंडावर मात करून 25 ते 30 तासाचा विमानप्रवास करून आले त्याच खरंच कौतुक...!
जसे आई - वडिलांना मुलांची आठवण येते ,ती जवळ असावे असे वाटते , त्याप्रमाणे मुलांनाही येतेच की , म्हणून तर ती सणावारी सुट्टी मिळाली की गावातल्या
आई-बाबांकडे धावत येतात. अगदी पुण्या-मुबई मध्ये शहरापासून लांब उपनगरात राहणारे सुद्धा सुट्टी मिळाली की मुख्य गावभागात राहणाऱ्या आपल्या आई-बाबांकडे येतात.
अगदी तसेच....... इथे येणारे आई - बाबा करतात.😊
@ वीरश्री वैद्य - करंदीकर
या इथे येणाऱ्या आई वडिलांचे मला कौतुक आहे ते याचसाठी की
' , आम्ही काही येणार नाही ....... तुम्हीच या ......
आम्हाला भीती वाटते.............आम्हाला नाही करमणार..... किंवा आम्हाला आमचे घर सोडून दुसरीकडे कुठे कुठे करमत नाही. ............असली कारणे ना देता ,
जशी मुले सुट्टी-सणावाराला ( वरची कुठलीही कारणे न देता ) घरी येतात तसेच इथे आले आहेत म्हणून.
इथे येणाऱ्या आई-वडीलांपैकीपैकी बरेचजण तर कदाचित भारतात राज्याबाहेरही गेले नसतील .......
बरेच जणांना english येत नसेल...........
बाहेर वागण्याबोलण्याचा confidence ही नसेल कदाचित , पण तरीही लाडक्या मुलांसाठी ( यात मुलगा-मुलगी दोन्हीही आले) ते या सगळ्या न्यूनगंडावर मात करून 25 ते 30 तासाचा विमानप्रवास करून आले त्याच खरंच कौतुक...!
जसे आई - वडिलांना मुलांची आठवण येते ,ती जवळ असावे असे वाटते , त्याप्रमाणे मुलांनाही येतेच की , म्हणून तर ती सणावारी सुट्टी मिळाली की गावातल्या
आई-बाबांकडे धावत येतात. अगदी पुण्या-मुबई मध्ये शहरापासून लांब उपनगरात राहणारे सुद्धा सुट्टी मिळाली की मुख्य गावभागात राहणाऱ्या आपल्या आई-बाबांकडे येतात.
अगदी तसेच....... इथे येणारे आई - बाबा करतात.😊
@ वीरश्री वैद्य - करंदीकर
Monday, June 26, 2017
'ME' time
प्रत्येकीने स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे , विशेषतः लग्नानंतर...........आधी नवा संसार आणि नंतर मुलं त्यामुळे वेळच मिळत नाही....हे पालुपद 90% बायका हमखास वापरतात........सकाळ पासून संध्याकाळ पर्यँत घरची कामे , पोरांचे खाणे - पिणे, यातच कसा वेळ जातो याचीच चर्चा करतात.....भेटल्यावरही. (जणू काही जगातले सगळे दुसरे विषय बॅन आहेत )
जोपर्यत मुले लहान असतात, आपल्यावर अवलंबून असतात तोपर्यंत काही वाटत नाही.
पण ती जेव्हा independent होतात ........त्यांचे जग विस्तारत जाते .........त्यावेळी आई जवळ भरपूर रिकामा वेळ राहतो आणि तो खायला उठतो.
मग आधी खूप वर्ष बऱ्याच गोष्टी मागे पडलेल्या असतात छंद, आवडीनिवडी इ. इ.
काहीतरी घटना , निमित्ताने त्या आठवतात नाहीतर एव्हाना त्याचा पूर्ण विसर पडलेला असतो ......... त्याकडे परत जावं तर ते out of syllabus वाटते नाहीतर आपण तरी त्या गोष्टीच्या out of syllabus वाटायला लागतो.
कारण छंद, आवडीनिवडी यांना सुद्धा upadation असतात , ती करावी लागतात.
हा परत जायचा मार्ग अनेकजणीना मिळत नाही.....
नक्की आपल्याला काय हवंय कळत नाही ........
सगळंच बिनसतं मनात......
एव्हाना एक चाकोरीबद्ध आयुष्य आणि रुटीन नकळत तयार झालेले असते...... मग बाकीचे लोक पण तुम्हाला त्याच पद्धतीने गृहीत धरायला लागतात.(याला कारण तुम्हीच असता)
एखाद्या कोणाला आपल्यासारखीच आवड , किंवा छंद असल्यास "मी पण आधी करायचे " हे वाक्य तुम्हाला कितीही nostaligic वाटलं तरी समोरच्याला ते एकतर बोअर वाटतं किंवा खोटं.
ज्यांना सारखं सारखं घर आवरणे आणि सारखं सारखं नवीन काहीतरी स्वयंपाकात करणे हे दोनच छंद असतील , त्यांच्यासाठी ही पोस्ट नाहीच , कारण त्यांना हे रिकामेपण येणार नाही कदाचित.
मग आल्यागेल्याचे करा ,त्यांना खाऊ बांधून द्या, डबे भरून द्या, पुन्हा पुढच्या येणाऱ्यांची तयारी करा, असे सगळे करता करता आपला जन्मच पुड्या बांधण्यासाठी असे स्वतः लाच पटवून द्यायची वेळ येते .
बोलताना कायम आपल्या घरच्यांचे आणि मुलांचे सांगत बसणं........सकाळी ही भाजी न संध्याकाळी ती......... एखादे दुःख घेऊन कुरवाळत बसणं ....त्यावर sympathy मिळवण ..... काही नाही तर रटाळ सीरिअल वर चर्चा..... असले विषय तुम्हाला त्याच मनस्थितीत अडकवून ठेवतात.
आपला आनंद आणि inner piece टिकवून ठेवायचा असेल तर आपले छंद , आवडीनिवडी यांना वेळ द्या. ज्यांची मुले लहान आहेत त्यांना रोज देणे शक्य नसेल , मग आठवड्यातून दोनदा ,तीनदा एखादा तास तरी स्वतः साठी नक्की काढाच. वेळ न मिळण्याचे अनेक बहाणे असतात, कारण तो मिळत नाही ..... काढावा लागतो....
वेगळा वेळ काढायचा तर ठरवलेली कामं राहणार हे तर आलेच.....मग त्या praorities ठरवा पण स्वतः साठी वेळ काढाच......
@वीरश्री वैद्य - करंदीकर
जोपर्यत मुले लहान असतात, आपल्यावर अवलंबून असतात तोपर्यंत काही वाटत नाही.
पण ती जेव्हा independent होतात ........त्यांचे जग विस्तारत जाते .........त्यावेळी आई जवळ भरपूर रिकामा वेळ राहतो आणि तो खायला उठतो.
मग आधी खूप वर्ष बऱ्याच गोष्टी मागे पडलेल्या असतात छंद, आवडीनिवडी इ. इ.
काहीतरी घटना , निमित्ताने त्या आठवतात नाहीतर एव्हाना त्याचा पूर्ण विसर पडलेला असतो ......... त्याकडे परत जावं तर ते out of syllabus वाटते नाहीतर आपण तरी त्या गोष्टीच्या out of syllabus वाटायला लागतो.
कारण छंद, आवडीनिवडी यांना सुद्धा upadation असतात , ती करावी लागतात.
हा परत जायचा मार्ग अनेकजणीना मिळत नाही.....
नक्की आपल्याला काय हवंय कळत नाही ........
सगळंच बिनसतं मनात......
एव्हाना एक चाकोरीबद्ध आयुष्य आणि रुटीन नकळत तयार झालेले असते...... मग बाकीचे लोक पण तुम्हाला त्याच पद्धतीने गृहीत धरायला लागतात.(याला कारण तुम्हीच असता)
एखाद्या कोणाला आपल्यासारखीच आवड , किंवा छंद असल्यास "मी पण आधी करायचे " हे वाक्य तुम्हाला कितीही nostaligic वाटलं तरी समोरच्याला ते एकतर बोअर वाटतं किंवा खोटं.
ज्यांना सारखं सारखं घर आवरणे आणि सारखं सारखं नवीन काहीतरी स्वयंपाकात करणे हे दोनच छंद असतील , त्यांच्यासाठी ही पोस्ट नाहीच , कारण त्यांना हे रिकामेपण येणार नाही कदाचित.
मग आल्यागेल्याचे करा ,त्यांना खाऊ बांधून द्या, डबे भरून द्या, पुन्हा पुढच्या येणाऱ्यांची तयारी करा, असे सगळे करता करता आपला जन्मच पुड्या बांधण्यासाठी असे स्वतः लाच पटवून द्यायची वेळ येते .
बोलताना कायम आपल्या घरच्यांचे आणि मुलांचे सांगत बसणं........सकाळी ही भाजी न संध्याकाळी ती......... एखादे दुःख घेऊन कुरवाळत बसणं ....त्यावर sympathy मिळवण ..... काही नाही तर रटाळ सीरिअल वर चर्चा..... असले विषय तुम्हाला त्याच मनस्थितीत अडकवून ठेवतात.
आपला आनंद आणि inner piece टिकवून ठेवायचा असेल तर आपले छंद , आवडीनिवडी यांना वेळ द्या. ज्यांची मुले लहान आहेत त्यांना रोज देणे शक्य नसेल , मग आठवड्यातून दोनदा ,तीनदा एखादा तास तरी स्वतः साठी नक्की काढाच. वेळ न मिळण्याचे अनेक बहाणे असतात, कारण तो मिळत नाही ..... काढावा लागतो....
वेगळा वेळ काढायचा तर ठरवलेली कामं राहणार हे तर आलेच.....मग त्या praorities ठरवा पण स्वतः साठी वेळ काढाच......
@वीरश्री वैद्य - करंदीकर
Wednesday, June 21, 2017
खरा मान-पान
#_खरा_मान_पान
आपल्या कडे सण समारंभ यात मान - पानाची पद्धत आहे. या मान - पानात कपडे दिले जातात सुवासिनींची ओटी भरली जाते. पूर्वी ओटीत खण, नारळ, तांदूळ द्यायची पद्धत होती. शिजविण्यास उपयोगी म्हणून तांदूळ , नारळ आणि शिवण्याकरता उपयोगी म्हणून चोळी दिली जायची.
आज त्याची जागा ब्लाउज पिस ने घेतली आहे.
काही घरातून मात्र या मान- पानाचे अति अवडंबर केले जाते. अगदी मंगळागौर, डोहाळेजेवण किंवा घरातील पूजा यातही मान-पान होताना दिसतो.
मला यामागे यजमान व्यक्तिचा नेमका काय हेतू आहे ते कळत नाही. कारण बरेचदा या मान- पानात पक्षपातिपणा दिसतो. म्हणजे जवळच्या व्यक्तीना चांगले तर लांबच्या वा नावडत्या व्यक्तीला बरे अशी क्रमवारी पडते.
मग दिले याचे मानसिक समाधान हवे ........ का सगळे प्रथेप्रमाणे करतात याचे कौतुक हवे असते ???
तेच कळत नाही.
बरे! सगळ्यांचे सगळे केले पाहिजे असा यांचा सुर असतो ,
मग तूम्ही कर्तव्य म्हणून करता तर कौतुक किंवा परतफेडीची अपेक्षा का?........ तुमचे कर्तव्य तुम्ही करा बाकीच्यांचे त्यांचें ते बघून घेतील.
पण असे होतच नाही.
यजमान ज्यांना देतात त्यांच्याकडून मिळण्याची सुप्त इच्छा हि यांच्या मनात असते. ..........नुसते मिळण्याची नाही तर चांगले मिळण्याची............मुळात त्यांची ही इच्छा पूर्ण व्हायला त्यानी स्वतःनी काही निःपक्षपातीपणाने मान-पान केलेले नसतात..................मग कुचाळक्या सुरु होतात.... मी दिलेले असे तर त्यानी दिलेले तसे.................
बरेचदा न आवडलेले किंवा हलके दागिने वा कपडे फिरवले जातात.
असे म्हणतात 'देउन द्यावे ते चांगले द्यावे'.
मी त्याही पुढे जाऊन असे म्हणेन की आपल्या आनंदासाठी द्यावे,..... अपेक्षा न करता , ........ना कौतुकाची , ........
ना परतफेडिची .
"मी दिले , मला त्याच्या आनंद आहे ...... मी माझ्या आनंदासाठी दिले" असेच मनाशी म्हणालो तर अपेक्षा राहणार नाही आणि आपण जे केले त्याचा निर्भेळ, सुखमय आनंदच वाट्याला येइल.
मुळात जे सधन आहेत ज्याच्याघरी कपड्यांचे , दागिन्यांचे गठ्ठे लागले आहेत त्यांना देण्यापेक्षा ज्यांच्याकडे नाही अशाना दिलेले काय वाईट??
ज्यासाठी तुम्ही हे सगळे करता म्हणजे
'आनंद', 'आशिर्वाद' , 'कौतुक' या तीनही गोष्टी तुम्हाला मिळतील .
उदा. महत्त्वाचे एक-दोन समारंभ सोडले तर हि देवाणघेवाण परस्पर सामंजस्याने बंद करावी आणि यात लागणारा पैसा एखाद्या समाजसेवी संस्था ना द्यावा.......
माणसांसाठीच काय पण प्राण्यांसाठी काम करणाऱ्याही अनेक संस्था, संघटना आहेत. त्यांना मदत करावी. पैशाच्या स्वरूपात करायाची नसेल तर अन्न,औषधे या स्वरूपात करावी.
माझी आज्जी दरवर्षी रीतिप्रमाणे दिवाळसण , अधिकवाण करायची. एका वर्षी माझ्या बाबांनी तिला सांगितले कि ज्यांच्या घरीं आहे त्याना देण्यापेक्षा ते पैसे ज्याचे कपडे घेता ते एखाद्या आश्रमाला द्या.
आज्जीनेही जावयाचे कौतुक करत किंवा असे म्हणूया त्याच्या मान राखत तसे प्रत्येक वर्षी केले. असे कितीतरी लोक करत असतील , पण हे माझ्या घरचे उदा. आहे त्यामुळे मला महित आहे. मला त्या दोघांचे माणूस म्हणुन कौतुक आहेच पण जास्त कौतुक यासाठी आहे कि पारंपारिक रीत सोडून दुसरे करताना लोक काय म्हणतील ? किंवा आज्जी नेही ' मुलीच्या सासर कडचे काय म्हणतील ' ? असा विचार न करता जे योग्य , जे मनाला पटले तेच केले.
सुजाण नागरीक , सज्जन माणूस , भला माणूस अशी नुसती विशेषणे आपण ऐकत असतो. आपण पण असे काही काम करून आपल्याच नजरेत भले व्हायला काय हरकत आहे?
विचारधारेत मोठी तफावत असण्यार्या माणसाना हे पटवून देणे अवघड आहे. पण आपण स्वतः असे करु शकतो आणि आपल्या पुढच्या पिढीला तसे पटवून देणे आपल्या हातात आहे .
मुलांच्या हातूनच एखाद्या आश्रमात कपडे वा खाऊ वाटप करताना किंवा वृद्धाश्रमातील एखाद्या पंक्तीत स्वतःच्या हाताने वाढताना मला , माझ्या मुलाना जे समाधान मिळेल त्याची तुलना कशाशीच होउ शकत नाही आणि अशा आनंदात लोक काय म्हणतील हा विचार आसपास फिरकतच नाही.
@ वीरश्री वैद्य - करंदीकर
आपल्या कडे सण समारंभ यात मान - पानाची पद्धत आहे. या मान - पानात कपडे दिले जातात सुवासिनींची ओटी भरली जाते. पूर्वी ओटीत खण, नारळ, तांदूळ द्यायची पद्धत होती. शिजविण्यास उपयोगी म्हणून तांदूळ , नारळ आणि शिवण्याकरता उपयोगी म्हणून चोळी दिली जायची.
आज त्याची जागा ब्लाउज पिस ने घेतली आहे.
काही घरातून मात्र या मान- पानाचे अति अवडंबर केले जाते. अगदी मंगळागौर, डोहाळेजेवण किंवा घरातील पूजा यातही मान-पान होताना दिसतो.
मला यामागे यजमान व्यक्तिचा नेमका काय हेतू आहे ते कळत नाही. कारण बरेचदा या मान- पानात पक्षपातिपणा दिसतो. म्हणजे जवळच्या व्यक्तीना चांगले तर लांबच्या वा नावडत्या व्यक्तीला बरे अशी क्रमवारी पडते.
मग दिले याचे मानसिक समाधान हवे ........ का सगळे प्रथेप्रमाणे करतात याचे कौतुक हवे असते ???
तेच कळत नाही.
बरे! सगळ्यांचे सगळे केले पाहिजे असा यांचा सुर असतो ,
मग तूम्ही कर्तव्य म्हणून करता तर कौतुक किंवा परतफेडीची अपेक्षा का?........ तुमचे कर्तव्य तुम्ही करा बाकीच्यांचे त्यांचें ते बघून घेतील.
पण असे होतच नाही.
यजमान ज्यांना देतात त्यांच्याकडून मिळण्याची सुप्त इच्छा हि यांच्या मनात असते. ..........नुसते मिळण्याची नाही तर चांगले मिळण्याची............मुळात त्यांची ही इच्छा पूर्ण व्हायला त्यानी स्वतःनी काही निःपक्षपातीपणाने मान-पान केलेले नसतात..................मग कुचाळक्या सुरु होतात.... मी दिलेले असे तर त्यानी दिलेले तसे.................
बरेचदा न आवडलेले किंवा हलके दागिने वा कपडे फिरवले जातात.
असे म्हणतात 'देउन द्यावे ते चांगले द्यावे'.
मी त्याही पुढे जाऊन असे म्हणेन की आपल्या आनंदासाठी द्यावे,..... अपेक्षा न करता , ........ना कौतुकाची , ........
ना परतफेडिची .
"मी दिले , मला त्याच्या आनंद आहे ...... मी माझ्या आनंदासाठी दिले" असेच मनाशी म्हणालो तर अपेक्षा राहणार नाही आणि आपण जे केले त्याचा निर्भेळ, सुखमय आनंदच वाट्याला येइल.
मुळात जे सधन आहेत ज्याच्याघरी कपड्यांचे , दागिन्यांचे गठ्ठे लागले आहेत त्यांना देण्यापेक्षा ज्यांच्याकडे नाही अशाना दिलेले काय वाईट??
ज्यासाठी तुम्ही हे सगळे करता म्हणजे
'आनंद', 'आशिर्वाद' , 'कौतुक' या तीनही गोष्टी तुम्हाला मिळतील .
उदा. महत्त्वाचे एक-दोन समारंभ सोडले तर हि देवाणघेवाण परस्पर सामंजस्याने बंद करावी आणि यात लागणारा पैसा एखाद्या समाजसेवी संस्था ना द्यावा.......
माणसांसाठीच काय पण प्राण्यांसाठी काम करणाऱ्याही अनेक संस्था, संघटना आहेत. त्यांना मदत करावी. पैशाच्या स्वरूपात करायाची नसेल तर अन्न,औषधे या स्वरूपात करावी.
माझी आज्जी दरवर्षी रीतिप्रमाणे दिवाळसण , अधिकवाण करायची. एका वर्षी माझ्या बाबांनी तिला सांगितले कि ज्यांच्या घरीं आहे त्याना देण्यापेक्षा ते पैसे ज्याचे कपडे घेता ते एखाद्या आश्रमाला द्या.
आज्जीनेही जावयाचे कौतुक करत किंवा असे म्हणूया त्याच्या मान राखत तसे प्रत्येक वर्षी केले. असे कितीतरी लोक करत असतील , पण हे माझ्या घरचे उदा. आहे त्यामुळे मला महित आहे. मला त्या दोघांचे माणूस म्हणुन कौतुक आहेच पण जास्त कौतुक यासाठी आहे कि पारंपारिक रीत सोडून दुसरे करताना लोक काय म्हणतील ? किंवा आज्जी नेही ' मुलीच्या सासर कडचे काय म्हणतील ' ? असा विचार न करता जे योग्य , जे मनाला पटले तेच केले.
सुजाण नागरीक , सज्जन माणूस , भला माणूस अशी नुसती विशेषणे आपण ऐकत असतो. आपण पण असे काही काम करून आपल्याच नजरेत भले व्हायला काय हरकत आहे?
विचारधारेत मोठी तफावत असण्यार्या माणसाना हे पटवून देणे अवघड आहे. पण आपण स्वतः असे करु शकतो आणि आपल्या पुढच्या पिढीला तसे पटवून देणे आपल्या हातात आहे .
मुलांच्या हातूनच एखाद्या आश्रमात कपडे वा खाऊ वाटप करताना किंवा वृद्धाश्रमातील एखाद्या पंक्तीत स्वतःच्या हाताने वाढताना मला , माझ्या मुलाना जे समाधान मिळेल त्याची तुलना कशाशीच होउ शकत नाही आणि अशा आनंदात लोक काय म्हणतील हा विचार आसपास फिरकतच नाही.
@ वीरश्री वैद्य - करंदीकर
Tuesday, June 13, 2017
मध्यमार्ग
#_मध्यमार्ग_#
मुलांना शिक्षण english मधून का मराठी मधून हा विषय वादातीत आहे . अमेरिका ,युरोप ला जायचे शिकायला तर इंग्लिश आवश्यक आहे ... त्याचबरोबर मातृभाषा सुद्धा....... यातून मध्यमार्ग काढलेले एक उदाहरण आहे ते share करते, भविष्यात माझ्या मुलांसाठीही मी असेच करेन.....
आता मुलांना सरसकट english medium च्या शाळेत घातले जाते. यापैकी बऱ्याच मुलांच्या आई-वडिलांना येणारे english बघितले तर अजूनही काहींचे b आणि d मध्ये confusion असते.
'आपल्याला english येत नव्हते , नाहीतर आपण फार चांगले करिअर केले असते , मग मुलाना तरी चांगले explosure मिळावे' असा हेतू हे आई वडील सांगतात.
यात मुलाला ते सोपे जाईल का ?...
त्यात आलेल्या शंका त्याने आपल्याला विचारल्या तर आपण त्यांचे समाधान करू शकू का ? ......
रोज घरी येऊन मूल नेमके काय अभ्यास करत आहे हे तरी आपल्याला कळेल का ? ......
मुलाला आपल्यासारखीच english समजायला अडचण येत असेल , तर त्याला 'नेमके काय समजत नाही?', हे आपल्या लक्षात येईल का ?
असले कोणतेच विचार हे लोक का करत नाहीत ?????
घरात मराठी ( त्यातही प्रकार, कारण 12 मैलावर बदलणारी भाषा), शाळेत english ( त्यातही ब्रिटिश का अमेरिकन हा घोळ) किंवा हिंदी वापरली जाते . अशाने एकही भाषा पक्की होत नाही.
English मध्ये हजार चुका, आणि मातृभाषा तर नीट वाचता ही येत नाही ......सगळा धेडगुजरी कारभार .......
त्यामुळे कित्येकदा मुलाला आपल्या भावना समोरच्यापर्यंत नीट मांडताच येत नाहीत, त्याच्या दृष्टीने त्या क्लिअर असल्या तरी समोरच्याला या भाषेच्या सरमिसळी ने नीट कळत नाहीत.
मुळात तुमची मातृभाषा पक्की असेल तर त्याच्या बळावर तुम्ही इतर भाषा खूप चांगल्या शिकू शकता.
मूळच बळकट नसेल तर ते मूल रुजणार तरी कुठे आणि कसे ?
अजून एक अक्षरही बोलता येत नाही आणि आई-बाबा मुलांना 'क्लॅप क्लॅप' , 'नोझी नोझी 'करा हे शिकवतात ,.
उद्या त्याच मुलाने त्याचे spelling विचारले तर येईल का यांना??? ही शंका येते मला अशा लोकांकडे पाहून.
English is must, ते आलेच पाहिजे ,नाहीतर मुले या धावत्या जगात टिकणार कशी? वगैरे हे प्रश्न तर ओघाने आलेच. आपल्या देशाइतका english च बाऊ करणारा दुसरा देश नसावाच बहुतेक.
मला इतकेच म्हणायचंय की तुम्ही दुसरी कोणतीही भाषा शिकताना आधी मातृभाषेचा base पक्का पाहिजे.
नाहीतर मग आहेच 'एक ना धड............'
आमच्या family डॉक्टर Shraddha Pingle नी त्याच्या मुलीला 'गार्गी' ला मराठी शाळेत घातले ,
त्यांचे मत आहे की मुलांचे शिक्षण त्यांच्या मातृभाषेतूनच झाले पाहिजे, पण english पण आवश्यक म्हणून
त्याचबरोबर तिला घरात english बोलणे शिकवायला सुरुवात केली . तिची ग्रहणशक्ती , ...आकलन, ...आवड......
हे सगळे विचारात घेऊन, अगदी छोट्या छोट्या वाक्यांपासून जसे की ,
'Come here' , 'go to bed' पासून सुरुवात केली.
आज ती सातवी मध्ये आहे , सहज , सोपे आणि छान english बोलते. तिच्याइतका simple present tense चा सुंदर वापर माझ्याबरोबर B.A.english मधून झालेल्या batchmates ना सुद्धा येत नाही.
English शिकण्याचे आणि शिकवण्याचे हे उत्तम उदाहरण मला वाटते, ते ही मातृभाषेची कास न सोडता.
@ वीरश्री वैद्य - करंदीकर
मुलांना शिक्षण english मधून का मराठी मधून हा विषय वादातीत आहे . अमेरिका ,युरोप ला जायचे शिकायला तर इंग्लिश आवश्यक आहे ... त्याचबरोबर मातृभाषा सुद्धा....... यातून मध्यमार्ग काढलेले एक उदाहरण आहे ते share करते, भविष्यात माझ्या मुलांसाठीही मी असेच करेन.....
आता मुलांना सरसकट english medium च्या शाळेत घातले जाते. यापैकी बऱ्याच मुलांच्या आई-वडिलांना येणारे english बघितले तर अजूनही काहींचे b आणि d मध्ये confusion असते.
'आपल्याला english येत नव्हते , नाहीतर आपण फार चांगले करिअर केले असते , मग मुलाना तरी चांगले explosure मिळावे' असा हेतू हे आई वडील सांगतात.
यात मुलाला ते सोपे जाईल का ?...
त्यात आलेल्या शंका त्याने आपल्याला विचारल्या तर आपण त्यांचे समाधान करू शकू का ? ......
रोज घरी येऊन मूल नेमके काय अभ्यास करत आहे हे तरी आपल्याला कळेल का ? ......
मुलाला आपल्यासारखीच english समजायला अडचण येत असेल , तर त्याला 'नेमके काय समजत नाही?', हे आपल्या लक्षात येईल का ?
असले कोणतेच विचार हे लोक का करत नाहीत ?????
घरात मराठी ( त्यातही प्रकार, कारण 12 मैलावर बदलणारी भाषा), शाळेत english ( त्यातही ब्रिटिश का अमेरिकन हा घोळ) किंवा हिंदी वापरली जाते . अशाने एकही भाषा पक्की होत नाही.
English मध्ये हजार चुका, आणि मातृभाषा तर नीट वाचता ही येत नाही ......सगळा धेडगुजरी कारभार .......
त्यामुळे कित्येकदा मुलाला आपल्या भावना समोरच्यापर्यंत नीट मांडताच येत नाहीत, त्याच्या दृष्टीने त्या क्लिअर असल्या तरी समोरच्याला या भाषेच्या सरमिसळी ने नीट कळत नाहीत.
मुळात तुमची मातृभाषा पक्की असेल तर त्याच्या बळावर तुम्ही इतर भाषा खूप चांगल्या शिकू शकता.
मूळच बळकट नसेल तर ते मूल रुजणार तरी कुठे आणि कसे ?
अजून एक अक्षरही बोलता येत नाही आणि आई-बाबा मुलांना 'क्लॅप क्लॅप' , 'नोझी नोझी 'करा हे शिकवतात ,.
उद्या त्याच मुलाने त्याचे spelling विचारले तर येईल का यांना??? ही शंका येते मला अशा लोकांकडे पाहून.
English is must, ते आलेच पाहिजे ,नाहीतर मुले या धावत्या जगात टिकणार कशी? वगैरे हे प्रश्न तर ओघाने आलेच. आपल्या देशाइतका english च बाऊ करणारा दुसरा देश नसावाच बहुतेक.
मला इतकेच म्हणायचंय की तुम्ही दुसरी कोणतीही भाषा शिकताना आधी मातृभाषेचा base पक्का पाहिजे.
नाहीतर मग आहेच 'एक ना धड............'
आमच्या family डॉक्टर Shraddha Pingle नी त्याच्या मुलीला 'गार्गी' ला मराठी शाळेत घातले ,
त्यांचे मत आहे की मुलांचे शिक्षण त्यांच्या मातृभाषेतूनच झाले पाहिजे, पण english पण आवश्यक म्हणून
त्याचबरोबर तिला घरात english बोलणे शिकवायला सुरुवात केली . तिची ग्रहणशक्ती , ...आकलन, ...आवड......
हे सगळे विचारात घेऊन, अगदी छोट्या छोट्या वाक्यांपासून जसे की ,
'Come here' , 'go to bed' पासून सुरुवात केली.
आज ती सातवी मध्ये आहे , सहज , सोपे आणि छान english बोलते. तिच्याइतका simple present tense चा सुंदर वापर माझ्याबरोबर B.A.english मधून झालेल्या batchmates ना सुद्धा येत नाही.
English शिकण्याचे आणि शिकवण्याचे हे उत्तम उदाहरण मला वाटते, ते ही मातृभाषेची कास न सोडता.
@ वीरश्री वैद्य - करंदीकर
Tuesday, June 6, 2017
#मनमोकळे
#मनमोकळे
कधीकधी समोरचा आपल्याला जे सांगत असतो ना त्यावर...... आपला सल्ला , प्रतिक्रिया असं काहीही त्याला नको असतं.....
त्याच्या डोक्यात अनेक विचार , घटना यांचा गुंता झालेला असतो ........... ते वेगळ्या करून त्याला तो सोडवायचा असतो ....
या गुंत्यामध्ये काहींची दुःख, ..काही वेडगळ घटना , ......काही मजेदार गुपितं,...... काही हास्यास्पद गोष्टी, ...
काही enjoyable आठवणी ..........असं बरंच काही असतं.
ऐकणारा जर good listener असेल त्याला हे सगळं आपल्याला सांगण्यामागे काय अपेक्षित आहे हे नीट ओळखता येतं.
प्रत्येकाला असा एक listener हवा असतो .... ज्याच्याकडे या गुंत्यातून मोकळं होता येईल,......जो सांगितलेल्या सगळ्या घटनांचा स्वतः ला त्रास करून न घेता ...... किंवा ते आणखी चार लोकांना as a gossip म्हणून न सांगता स्वतः च्या मनात त्याचा योग्य निचरा करू शकेल ............
पालपाचोळा , शिळे अन्न इ.चा योग्य निचरा झाला की कसे कंपोस्ट खत तयार होते तसे काही करणारा.........
@वीरश्री वैद्य - करंदीकर
कधीकधी समोरचा आपल्याला जे सांगत असतो ना त्यावर...... आपला सल्ला , प्रतिक्रिया असं काहीही त्याला नको असतं.....
त्याच्या डोक्यात अनेक विचार , घटना यांचा गुंता झालेला असतो ........... ते वेगळ्या करून त्याला तो सोडवायचा असतो ....
या गुंत्यामध्ये काहींची दुःख, ..काही वेडगळ घटना , ......काही मजेदार गुपितं,...... काही हास्यास्पद गोष्टी, ...
काही enjoyable आठवणी ..........असं बरंच काही असतं.
ऐकणारा जर good listener असेल त्याला हे सगळं आपल्याला सांगण्यामागे काय अपेक्षित आहे हे नीट ओळखता येतं.
प्रत्येकाला असा एक listener हवा असतो .... ज्याच्याकडे या गुंत्यातून मोकळं होता येईल,......जो सांगितलेल्या सगळ्या घटनांचा स्वतः ला त्रास करून न घेता ...... किंवा ते आणखी चार लोकांना as a gossip म्हणून न सांगता स्वतः च्या मनात त्याचा योग्य निचरा करू शकेल ............
पालपाचोळा , शिळे अन्न इ.चा योग्य निचरा झाला की कसे कंपोस्ट खत तयार होते तसे काही करणारा.........
@वीरश्री वैद्य - करंदीकर
Monday, June 5, 2017
Choice
#choice
काही लोकांना आपल्याच खरेदी , choice वर भरवसा नसतो. दुकानातच ते जाम confuse असतात किंवा असल्याचं भासवतात तरी ....... अमुक एक घेऊन आलो तर ते मला आवडलाय का ?..... चांगलं दिसतंय का ?
यापेक्षा पण लोक चांगले म्हणतील का? लोकांना आवडेल का ? याची काळजी यांना जास्त असते......
आणलेली खरेदी वापरायला काढली आणि लोकांनी जर काहीच compliment नाहीच दिली तर हे स्वतःच विचारतात , कसं आहे? किंवा चांगलं दिसत नाही का ?
जर लोक मस्त किंवा छान म्हणाले तर यांचा इगो जाम सुखावला जातो ,
लोक ठीक आहे असं म्हणाले किंवा यापेक्षा अमुक तमुक छान वाटलं असं म्हणले तर मात्र ही मंडळी जाम depress होतात ........ती लोकांना न आवडलेली खरेदी कपाटाच्या कोपऱ्यात किंवा माळावर टाकून देतात , न काढण्यासाठी.....
मी काय म्हणते मग चार लोकांना घेऊनच जावं ना शॉपिंग ला त्यांना काय आवडेल तीच खरेदी करावी आणि तेच वापरावं ......त्यांच्या choice ने घेतल्यामुळे ते चांगलच म्हणणार ....... हो की नै !😊
#So_simple_#
@ वीरश्री वैद्य - करंदीकर
काही लोकांना आपल्याच खरेदी , choice वर भरवसा नसतो. दुकानातच ते जाम confuse असतात किंवा असल्याचं भासवतात तरी ....... अमुक एक घेऊन आलो तर ते मला आवडलाय का ?..... चांगलं दिसतंय का ?
यापेक्षा पण लोक चांगले म्हणतील का? लोकांना आवडेल का ? याची काळजी यांना जास्त असते......
आणलेली खरेदी वापरायला काढली आणि लोकांनी जर काहीच compliment नाहीच दिली तर हे स्वतःच विचारतात , कसं आहे? किंवा चांगलं दिसत नाही का ?
जर लोक मस्त किंवा छान म्हणाले तर यांचा इगो जाम सुखावला जातो ,
लोक ठीक आहे असं म्हणाले किंवा यापेक्षा अमुक तमुक छान वाटलं असं म्हणले तर मात्र ही मंडळी जाम depress होतात ........ती लोकांना न आवडलेली खरेदी कपाटाच्या कोपऱ्यात किंवा माळावर टाकून देतात , न काढण्यासाठी.....
मी काय म्हणते मग चार लोकांना घेऊनच जावं ना शॉपिंग ला त्यांना काय आवडेल तीच खरेदी करावी आणि तेच वापरावं ......त्यांच्या choice ने घेतल्यामुळे ते चांगलच म्हणणार ....... हो की नै !😊
#So_simple_#
@ वीरश्री वैद्य - करंदीकर
Subscribe to:
Posts (Atom)








